Wednesday, September 3

मराठी माणसाचं अस्तित्व हे महत्वाचं!



मराठी माणसे, भाषा आणि संस्कृतीचा मुद्दा हाती घेऊन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटविणारे राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माणाचा आराखडा मांडून मराठी तरूणांच्या हाती काही स्वप्ने ठेवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या, पत्रकार राजू परूळेकर यांनी साम वाहिनीसाठी घेतलेल्या मुलाखतीतील हा काही भाग -

मनसेच्या स्थापनेनंतर अनेक अटकळी बांधल्या जात होत्या. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठविण्याची नांदी तुम्ही परत एकदा केली. शिवसेनेनंतर परत असे करावे, ही वेळ तुमच्यावर का आली?- शिवसेनेत असताना मी हीच ही भूमिका मांडत होतो. रेल्वे नोकऱ्यात बिहारींविरोधात मी आंदोलन केलं होतं. महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे. जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा. पण तो घडलेला महाराष्ट्र कोणाच्या घशात घालायचाय? महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांच्या, मराठी माणसाच्या वाट्याला ती प्रगती येत नसेल, तर ती काय करायची? त्यासाठी साफसफाई पहिली आणि प्रगती नंतर असं मी ठरविलं. कितीही करीत राहिलात, तरी परप्रांतीयांचे लोंढे या सगळ्या गोष्टी खाऊन टाकतात. तो विचार करून माझी वाटचाल सुरू आहे.

नेमके कोणत्या मुद्‌द्‌यांवर हे आंदोलन जाणार आहे?- सगळेच मुद्दे समोर येत आहेत. स्थानिकांना नोकऱ्यांत 80 टक्के प्राधान्य हे आहेच. पण प्रवेशापासून हे सर्व सुरू होतं. तिथं स्थानिकांना प्रवेश न देता परप्रांतियांना प्रवेश देत असाल, तर स्थानिक मुलांनी जायचं कुठं?

गरीब बिचारे पोटासाठी येतात. त्यांच्यावर तुमचा राग का?- मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, मायावती इथं येतात. तेव्हा तेच गरीब बिचारे त्यांच्या सभेसाठी जातात. राजकीय ध्रुवीकरण यामाध्यमातून होतं, त्याकडे बघणार आहोत की नाही.... ते ज्या पध्दतीने आपली पॉकेट्‌स तयार करतात... मुंबई महापालिकेत किती उपरे नगरसेवक आहेत? कोणत्याही राज्यात असं नाही. तेच उद्या पुणे, नाशिक, ठाणे इथंही होणार आहे.

भारतीय संविधानाने कोणालाही कुठेही जायला परवानगी दिली आहे. तुम्ही नेमकं काय करणार?- महाराष्ट्रातील जे कायदे आहेत, त्यांची अंमलबजावणी नीट झाली, तर हे प्रश्‍न येणार नाहीत. मराठी पाट्यांचा मुद्दा मी मांडला. तो कायदा आहे. कायद्याची अंमलबजावणी होत नाही... सिक्‍युरिटी एजन्सीबाबत कायदा आहे, की एका एजन्सीने पाचपेक्षा अधिक परप्रांतियांना नोकरीत ठेवलं, तर त्यांना कायदेशीर तरतुदींनुसार वेगळी परवानगी घ्यावी लागते. याचं पालन कुठेही होताना दिसत नाही. मी कायद्याच्या गोष्टी बोलत आहे. स्थानिक भूमीपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, असा महाराष्ट्राचा कायदा आहे. इथल्या भूमिपुत्राला माहिती तरी असते का, की कुठले कारखाने येत आहेत, कुठे नोकऱ्या येत आहेत?

मराठी बुध्दिवंत व उच्चवर्गातील मराठी माणसांचे मत आहे, की हा मुद्दा ग्लोबलायझेशनच्या युगात लागू होत नाही.- हे कसलं ग्लोबलायझेशन! चीन हा विचार का करीत नाही. चीन, फ्रान्स आपली भाषा पकडून बसला आहे. आपल्या देशात जन्मापासून, अनेक वर्षांपासून इतक्‍या भाषा आहेत. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक यांना तुमची भाषा सोडा, असं कोणी सांगत नाही. आम्ही ओरडलो की ग्लोबलायझेशन!

भाजप, कॉंग्रेस, शिवसेना या पक्षात बरेच उत्तर भारतीय आहेत. सर्व पक्षांनी हे कल्चर महाराष्ट्रात स्वीकारलं आहे. हा मुद्दा राजकीय भवितव्य निर्माण करणार आहे. तो पुढे नेणार की मागे?- मराठी माणसाचं अस्तित्व हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट नगरसेवक, आमदार, खासदार या गोष्टींवरून तपासून घ्यायची, असं नाही. गुजरातची निवडणूक गुजरात स्वाभिमानाच्या मुद्‌द्‌यावर झाली. नरेंद्र मोदी हिंदुत्व विसरून गेले व हा मुद्दा लावून धरला. बाकीची राज्ये स्वतःची भाषा व मुद्‌द्‌यांवर निवडणूक लढवतात. आपल्याकडचेच पिचक्‍या पाठकण्याचे आहेत. नको तिथं लाचार व्हायचं. आपल्याकडे साडेदहा- अकरा कोटींच्या महाराष्ट्रात साडेआठ-पावणेनऊ कोटी मराठी जनता राहते, ती तुम्हाला महत्वाची वाटत नाही? आणि तुम्हाला दीड-पावणेदोन कोटी परप्रांतीय महत्वाचे वाटतात?

मराठी जनतेचा तुमच्या भूमिकेला किती पाठिंबा आहे?- अनेक ठिकाणांहून मला रिऍक्‍शन आल्या. मॉलमध्ये जाताना, रिक्षा- टॅक्‍सीत बसताना मराठी बोलायला लागले. जे दबकत होते, ते आता उघडपणे बोलायला लागले आहेत.

व्यवहाराची भाषा मराठी ठेवता येत नाही. यावर उपाय काय?- आपण आपल्या भाषेत बोलावे. तो कामासाठी आला आहे. त्याला कामाची गरज आहे. तो भाषा शिकून घेणार. अन्य राज्यात तसं आहे. तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम राहिलात, की तो तुमची भाषा शिकून घेतो. अनेक मारवाडी उद्योगपती कोलकत्त्याला गेले, त्यांना बंगाली शिकावे लागले. बीएमडब्ल्यूसारखे कारखाने तमिळनाडूला गेले. परदेशी लोक तमिळ शिकत आहेत. तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहिलात, की बाकीच्यांना झक मारून ती गोष्ट करावी लागते.

या प्रकारची तुमची भूमिका ही राज्यातील राजकीय बदलाची नांदी ठरू शकते?- वर्तमानपत्रे समाजाचा आरसा असतात. त्यातली वाचकांची पत्रे काय सांगतात? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून मांडला गेलेला हा मुद्दा किंवा खास करून आपण शिवसेनेच्या जन्मापासून बघू... मुंबई, ठाण्यापुरता एकेकाळी असलेला प्रश्‍न राज्याचा बनला आहे. याबाबत राज्यभरातून, परदेशातून पत्रं येतात. हा मुद्दा असा कसा गेला. मी जे बोललो, ते प्रत्येकाच्या मनात होतं, म्हणून पसरलं. ही गोष्ट प्रत्येक जिल्ह्यात आहे. तुम्ही रायगड, सांगली, ठाणे, पुणे, नाशिक जिल्ह्यात जा. प्रत्येक जिल्ह्यात यूपी, बिहारवाले घुसले आहेत आणि त्यांची मस्ती आहे.

पण जैनधर्मीय मराठी माणसांना घरे नाकारत आहेत?
- हे अत्यंत चुकीचं आहे. याची चर्चा होते, पण लोक पुढे येत नाहीत. कायद्याने अशा सोसायट्या करूच शकत नाहीत. मायनॉरिटी कॉलेज नावाची गोष्टच नाही आहे.

मायनॉरिटी कॉलेजचा मुद्दा काय आहे?
- नगरनियोजन आराखड्यात जे भूखंड शिक्षणसंस्थांसाठी राखीव असतात, ते या संस्थांना स्वस्तात मिळाले. त्यावर हे प्रांत, जातीच्या आधारावर मायनॉरिटी कॉलेज काढणार. तुमचे चोचले पुरवायचे असतील तर खासगी जागा घेऊन काय ते करा. तुम्ही सरकारचे प्लॉट घेणार आणि इतरांना ऍडमिशन देणार नाही? हे सर्व खोदून काढलं पाहिजे. प्रत्येक वेळी काचा फोडल्या आणि ते घाबरले, असं होणार नाही. सर्व अंगांनी माझं काम सुरू आहे. कायदे व न्यायालयाच्या माध्यमातूनही माझं काम सुरू आहे. रस्त्यावर जशी लढाई सुरू आहे, तशी ती अन्य माध्यमातूनही लढावी लागेल. तरच हे प्रश्‍नच सुटणार आहेत.

राज्यात हे आंदोलन उभं राहणं हे राजकीय पक्षासाठी पुरसं आहे का?
- मराठी माणसाच्या आतला राग कधीतरी बाहेर काढायलाच पाहिजे की नाही. आतापर्यंत हीच गोष्ट होत राहिली. मतांचे व नोटांचे राजकारण यावर हे मुद्दे बाजूला पडले आणि मराठी माणूस बाहेर फेकला गेला. मी जी गोष्ट करतोय, ती त्याला पटली तर त्याचंच भलं आहे. शेवटी महाराष्ट्र हे राज्य कोणासाठी ओळखले जाणार आहे? मराठी माणसासाठी की अन्य कोणासाठी?

तुमचे एकट्याचे प्रभावशाली असणे, हे राजकीय पक्षाचे प्रभावशाली असणे मानता का?संघटनात्मक पातळीवर नेत्यांची फळी, कार्यक्रम दिसत नाही?
- शंभर वर्षांची कॉंग्रेस, साठ वर्षांचा जनसंघ व भाजप, चाळीस वर्षांची शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष... हे अनेक वर्षांचे पक्ष आहेत आणि माझी अडीच वर्षे. अशी तुलना करून बघा, मग कळेल.

निवडणुकीला किंवा जनतेला सामोरे जाणार, तेव्हा तुम्हाला हे मुद्दे घेता येणार नाहीत?
- अगदी बरोबर आहे. माझ्याबरोबर आज जे सहकारी आहेत, ते वेगवेगळ्या पदांवर गेले. ते उद्या नगरसेवक, आमदार, खासदार बनतील, तेव्हा त्यांची इमेज बनेल. बाकीच्या राजकीय पक्षातील लोक तरी होते कोण? त्यांचं अस्तित्व काय होतं? त्यांनाही पदे मिळाल्यावर काही गोष्टी करून दाखविल्या व समाजात स्थान मिळालं. माझ्या माणसांच्या आज कोऱ्या पाट्या आहेत. ते उद्या निवडून येतील व त्यांची इमेज तयार करतील.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य कॉंग्रेस नेते यांनी निवडणुकीची काही समीकरणं तयार केली आहेत. ही वजाबाकी करून तुम्हाला राजकीय यश मिळू शकेल?
- अनेक पराभव बघितल्यावर शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महापालिका १९८५ साली आली. त्यावेळी पोस्टर होतं, मराठी माणसा जागा हो. तुझी मुंबई तुझ्यापासून हिरावली जात आहे. त्यावेळी जो मुद्दा होता, तो महाराष्ट्रात इतका पसरला नव्हता. मुंबईत काय चाललं आहे, हे महाराष्ट्रातील लोकांना कळतच नव्हतं. आता परप्रांतियांचे लोंढे मुंबईपुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहेत. अनेक आंदोलनाच्या वेळी अनेक ठिकाणी मनसेचे कार्यकर्तेही नव्हते. लोकांनी उस्फूर्तपणे आंदोलन केलं. हे कशाचं द्योतक आहे? हे कशामुळे आणि का झालं? आणि राजकीय यशाची मला कुठे घाई आहे! लोक विचारतात २००९चं काय? लोकांची मर्जी आणि मतांवर अवलंबून आहे. जनतेने ठरविलं, तर सत्ता देतील. नाहीतर नाही देणार! कोण कसं वागत जातं, त्यानुसार रंग बदलत जायचे... मला ते झेपणार नाही व जमणारही नाही.

यूपी, बिहारची माणसं सनदी अधिकारी, राजकारण व अन्य क्षेत्रातही आहेत. त्यांची शक्ती, पैसा याला किती पुरे पडणार?- त्यांच्या शक्तीपेक्षा महाराष्ट्रातील १० कोटी मराठी जनता ही शक्ती खूप मोठी आहे. ती एकवटली तर ते काहीही करू शकणार नाहीत. महाराष्ट्रातील मराठी प्रशासन, पोलिस, शासकीय मराठी अधिकारी व विविध क्षेत्रातील लोकांना आता वाटायला लागले आहे... मला तशा प्रतिक्रिया येत आहेत. मला काही हाणामाऱ्यांची हौस नाही.

अनेकांना वाटते की, राज ठाकरे यांचा मुद्दा बरोबर आहे, पण मार्ग चुकीचा आहे?
- मग मार्ग तुम्हीच सांगा. आम्ही निवेदनाचा पहिला मार्ग निवडला. त्यातील चांगली भाषा कोणाला समजत नाही. दुसरा मार्ग सांगा ना? मर्सिडीज बेंझच्या शाळेचं काय झालं? त्यांना आम्ही निवेदन दिलं, की १५ ऑगस्टच्या दिवशी सर्व शाळांमध्ये झेंडावंदन होते, तसे तुम्ही करावे. पण आम्ही करीत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. इथं यायचं, जमीन मिळवायची, शाळा उभारायच्या आणि याच देशाचा झेंडा फडकावणार नाही, असं सांगायचं! पोलिस आमच्या कार्यकर्त्यांना मारणार आणि त्यांना काही करणार नाही!

हे आंदोलन दबलं जाईल, असं तुम्हाला वाटतं का?
- अशाप्रकारे आंदोलने दबली जात नाहीत आणि जाणारही नाहीत. मराठीचं आंदोलन तर नक्कीच नाही. प्रशासनाने अगोदर झालेली आंदोलने तपासावीत. ज्यावेळी आंदोलन दाबण्याचे प्रयत्न झाले, त्यावेळी ते दुप्पट वेगाने उसळून आले. त्यांनी ते दाबण्याच्या भानगडीतही पडू नये. हे काय मी माझ्यासाठी करतोय? यात काय माझा स्वार्थ आहे? प्रत्येकाला वाटते काहीतरी राजकारण आहे, मते मिळविण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक गोष्ट तिथेच येऊन थांबते का? दुसरे काही अँगलच नसतात का?

दुसऱ्या काही पक्षांशी चर्चा झाली का? इतरांसाठी तुमच्याबाजूने चर्चेचे दरवाजे का नाही उघडले?
- सध्या राजकारणात मी तसा अस्पृश्‍य आहे. मग मी काय दरवाजा उघडून उभा राहू का?

प्रश्‍नांबाबत विरोधक आंदोलन करून, आवाज उठवून सत्ता हस्तगत करतात. पण विरोधी पक्षाने मांडलेला मुद्दा जनतेने उचलला तरी अन्य विरोधी पक्षांनी उचलला नाही किंवा तेवढ्या तीव्रतेने पुढे नेला नाही, हे का?
- त्यांना असुरक्षितता वाटत असेल. इतर समाजाची मतं काबीज करण्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. हा मराठी माणसाचा अपमान आहे. मराठी माणसाच्या जीवावर महाराष्ट्रात सत्ता येऊ शकत नाही? जे आजपर्यंत घडलं नाही, ते आता होईल! मराठी माणसं समुद्रकिनारी राहतात, त्यामुळे त्यांचे मेंदू सडके आहेत, असे एक बिहारचा खासदार लोकसभेत बोलला आणि आपले ४८ खासदार गप्प राहतात! एकानेही विरोध केला नाही. सी. डी. देशमुखांची उदाहरणं भाषण करताना द्यायची की त्यांनी नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकला. मग लोकसभेत अपमान होत असताना एकही खासदार बोलत नाही? इतरांची मते जातील म्हणून? मराठी माणसांच्या मतांवर विश्‍वासच नाही. मराठी माणूस एकवटून मते देऊ शकतो आणि राज्य हातात देवू शकतो, यावर विश्‍वासच नाही. मला तो विश्‍वास उभा करायचा आहे.

त्यासाठी एका मजबूत संघटनेची व कार्यकर्त्यांच्या जाळ्याची आवश्‍यकता असते. त्यात तुम्हाला यश मिळालं आहे का?- शंभर टक्के. तुम्ही कोणत्या अँगलने बघता हा वेगळा भाग. राज्यातील कुठल्याही तालुक्‍यात जा, तुम्हाला मनसेचा कार्यकर्ता सापडणारच. अडीच वर्षांएवढ्या कमी काळात राज्यात सर्वदूर पसरलेला दुसरा स्वतंत्र पक्ष सांगा.

दुसऱ्या पक्षाने पुन्हा आपलाच जुना मराठीचा मुद्दा हाताशी धरला. त्यामुळे तुमचा मुद्दा पुढे नेण्यात अडचण येईल का? असुरक्षितता वाटते का?
- मी जो मुद्दा जेवढ्या प्रखरपणे रेटू शकतो, तेवढा ते मांडूच शकत नाहीत. नाहीतर त्यांची अन्य मतं जातील. मला त्याची पर्वा नाही. त्यांनाच आहे. आमचाच जुना मुद्दा आहे, असं ते म्हणतात. १९८५ पासून पाच वर्षांचा अपवाद वगळता महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचीच सत्ता आहे ना? मग १९८५ ते २००८ एवढ्या काळात मराठी पाट्यांचा मुद्दा निकालात का निघाला नाही? पाट्या मराठीत अजून का झाल्या नाहीत? मी निवेदन दिल्यावर जयराज फाटक यांनी नोटीस दिली. कुठल्याही इतर राज्यात हे दुकानदार जातात, तिथल्या राज्याचे नियम व अटी पाळतात ना? शिथीलता तुम्हाला मुंबई, पुण्यात व महाराष्ट्रातच हवी का?

शिवसेनाप्रमुखांनी मराठीचा मुद्दा मांडला व सत्तापदे मिळाल्यावर यू टर्न मारला. तुमच्याबाबतीत तसे होणार का?
- काळच त्याचं उत्तर देईल! विश्‍वास ठेवा. माझं तसं होणार नाही! १९८५ व २००८ या काळात केवढा फरक आहे. आता मराठी माणसाची पीछेहाट झालेली दिसत आहे. एका शाळेत शिक्षिका होत्या. एका मुलाला नीट उत्तर देता आले नाही. तेव्हा "यू ब्लडी महाराष्ट्रीयन' असं त्या बाई बोलल्या. त्यावर सर्व मुलं उभी राहिली आणि त्यांनी शिक्षिकेला घालवून दिलं. त्यांच्यावर प्राचार्यांनी कारवाई केली. ही पुण्यातील शाळा आहे. 20 वर्षांपूर्वी अशी मुलं उभी राहिली असती का? त्या मुलांना उभं करायला राज ठाकरे नव्हता गेला! आम्ही मराठी आहोत, ही भावना जागृत होणं, ही माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे.

उत्तरेतील नेत्यांना महाराष्ट्राबद्दल आकस आहे. त्यांच्याशी कोणत्या साधनसामग्रीशी तुम्ही लढणार?
- ठाम विश्‍वास! हे प्रश्‍न नरेंद्र मोदी, चंद्राबाबू नायडू, जयललिता किंवा इतरांना पडत नाहीत. आम्हीच कशाला उत्तरेचा विचार करायचा? दिल्लीचा आकस आहे, हे आपल्याला माहीत आहे. त्यापध्दतीने पुढे जायचे. महाराष्ट्र व गुजरात हे दोनच प्रदेश दक्षिण व उत्तर भारत या विभाजनामध्ये लटकले आहेत. गुजराती समाजाकडे पैसा आहे. त्यामुळे त्यांच्या हनुवटीला हात लागतात. महाराष्ट्राकडे विद्वत्ता आहे. त्यामुळे डोक्‍याला हात लावण्यापलीकडे काही नाही. विद्वत्तेमुळे महाराष्ट्राची भीती दिल्लीश्‍वरांना पहिल्यापासून वाटत आली आहे. ही ताटाखालची मांजरे होणार नाहीत, असे तेव्हा वाटत होते. आता होतात आणि त्यासाठी वेळही लागत नाही! भौगोलिक रचनेचा विषय असल्याने महाराष्ट्राची लॉबी नाही. राज्यातील ४८ खासदार दिल्लीत गेले, की त्यांची तोंडे दहा दिशेला. पण महाराष्ट्रातील जनता सक्षम आहे आणि माझा विश्‍वास ठाम आहे. त्यावर पुढे जाईन.

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यामधील कोणत्या प्रकारचे कार्यकर्ते तुम्हाला अपेक्षित आहेत? सामनात छापून येते तुमच्या पक्षातून कार्यकर्ते शिवसेनेत परत गेले.
- हे स्वतःच्या पक्षाच्या मुखपत्रात छापतात की हे आले, हे गेले. माझी ३ मे ला दुसरी सभा झाली. शिवाजी पार्क भरले. पुण्याला सभा झाली. कोण आले व कोण गेले, स्वतःच ठरवायचे? या खिशातून काढायचे आणि या खिशात घालायचे! महाराष्ट्रातील कुठल्याही भागात माझ्याबरोबर चला. माझे कार्यकर्ते दिसतील.

शिवसेनेकडे मराठी कार्यकर्त्यांचं बळ असून ते मराठीच्या मुद्‌द्‌यावर लढत नाहीत. याबद्दल खंत वाटते?
- शंभर टक्के. त्यावर काय करणार? तेही आहेत. ते माझेच आहेत की, सर्वार्थाने.

नारायण राणे व राज ठाकरे यांची काही समीकरणे आहेत का? जुन्या सहकाऱ्याबद्दल तुमची भावना काय?
- मी २००५ मध्ये बाळासाहेबांचं पुस्तक करीत होतो. मला सात-आठ महिने वेळच नव्हता. त्यावेळी ११ मे रोजी मला राणे भेटले. १२ किंवा १३ मे ला मी परदेशी गेलो आणि २ किंवा ३ जूनला आलो. तोपर्यंत राणे परदेशात गेले आणि जुलैमध्ये आले. त्यानंतर हे सुरू झालं. त्यामुळे माझं आणि त्यांचं ठरलं होतं, असं नाही. मी कोणाच्याही हाताखाली काम करू शकत नाही. त्यामुळे कोणाच्याही पक्षात जाण्याचा प्रश्‍नच नाही. माझ्या डोक्‍यातही नव्हतं, की मी पक्ष काढेन. ज्या पध्दतीने चाललं होतं, अपमान होत होता, त्याचा प्रचंड राग होता. पक्ष सोडावा, हे राणे बाहेर पडले, तेव्हाही डोक्‍यात नव्हतं. मी बाहेरच पडावं यासाठी काहींचे ढकलण्याचे प्रयत्न होते. जगाला नावं माहीत आहेत. मी दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नव्हतो. स्वतंत्र पक्ष काढण्याची त्यांची मानसिकता नाही. आता तरी कसे येणार एकत्र. आता ते काय करतात मला माहीत नाही. काय निर्णय घेतात ते बघू.

निवडणुका लढविणं हा राजकीय पक्षाचा धर्म आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात मैत्री किंवा विरोध याचं धोरण ठरलं आहे का?
- मी राजकीयदृष्ट्या अस्पृश्‍य आहे. मी मराठी माणसाची बाजू घेतो, ते कुठल्याही पक्षाला परवडणार नाही. युत्यांचा विचार करून पक्ष मोठा करता येत नाही. मी स्वबळावर निवडणुका लढविण्याचा विचार करीत आहे. बरोबर कोण येणार याची काहीच कल्पना नाही.

राष्ट्रीय धोरण असलेल्या कॉंग्रेस, भाजपसारख्या पक्षांशी राजकीय लग्न होऊ शकतं का?
- माझ्या डोक्‍यात युतीचा विचार नाही. असले विवाह घटस्फोटाकडे जातात. असली लग्नं रोज करता येतील.

तुम्ही शेती, सेझ, असंघटित कामगार, औद्योगिक क्षेत्र आदी विकासाचे मुद्दे घेत नाही?
- यावर मी स्टेटमेंट देऊन झाली. पण दगडफेक न झाल्यामुळं कोणी फारशी दखल घेत नाही. पत्रकार परिषदांमध्ये बोललो. पण त्यात कॉंन्ट्रोव्हर्सी नाही ना? कर्जमाफीने हे प्रश्‍न सुटणार नाहीत. निवडणुकीत घरं, वीज फुकट देऊ, अशी आश्‍वासनं देतात. परमेश्‍वर पाणी फुकट देतो, त्याचं नियोजन करता येत नाही. वर्षानुवर्षे त्याच-त्याच मुद्‌द्‌यांवर निवडणुका लढवतो. अनेक आमदार बदलले, पण गावात त्याच मुद्‌द्‌यांवर निवडणुका लढविल्या जातात. पंतप्रधान मनमोहनसिंह नुकतेच बोलले, बारामतीसारखा देशाचा विकास व्हायला हवा. म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांच्या बारामती मतदारसंघाचा विकास जेवढा होतो, तेवढा महाराष्ट्राचा होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ असून, मला छोट्या मतदारसंघात रस नाही.

तुम्ही निवडणूक लढवणार का?
- निवडणूक लढवण्याचा विचारही माझ्या मनाला शिवत नाही. त्याला कारण म्हणजे लहानपणापासून झालेले संस्कार.

शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. माझ्या मनातलं मुख्यमंत्र्यांनी अंमलात आणलं नाही, असं कारण द्यायला ते मोकळे. तुम्ही असे करणार नाहीत?
- अनुभवातून आपण काही शिकतो की नाही? त्यातूनच शिकत जातो. इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहासाकडे का बघायचं? चुका पुन्हा पुन्हा करायच्या नाहीत. एकदा मातोश्रीवरून बाळासाहेब व मी शिवसेनाभवनला येणार होतो. आमचे ड्रायव्हर माने आले नव्हते. त्यामुळे टॅक्‍सी मागविली. महापौरांकडे लाल दिव्याची इंपाला गाडी होती. बाळासाहेब महापौरांच्या गाडीत बसणार नव्हते. मग बाळासाहेब व मी टॅक्‍सीत पुढं आणि लाल दिव्याची इंपाला मागे, असं चित्र होतं. माझ्यासाठी लाल दिव्याची गाडी ही छोटी गोष्ट आहे. महाराष्ट्राची सुधारणा होणं हे मोठं.

तुम्हाला अटक झाली, उद्रेक झाला. सतत लढाई, आंदोलन, यामुळे राजकीय नेता व माणूस म्हणून असुरक्षिततेची भावना वाटते का?
- मी लहानपणापासून अशी परिस्थिती पहात आलेलो आहे. भिवंडीत १२ वर्षांनी शिवजयंती साजरी झाली, तेव्हा बाळासाहेबांबरोबर मीच होतो. पनवेलला बैठकीला जात असताना गाडीवर दगडफेक झाली होती. अनेक प्रसंग आणि घटना पाहात आल्याने मला कधीच भीती किंवा दडपण वाटलं नाही.

मुसलमानांबद्दल भूमिका काय?
- महाराष्ट्रातील मराठी मुसलमान सुसंस्कृत आहेत. यूपी, बिहार, बांगलादेश येथील मुसलमानांनी जी पॉकेट्‌स बनविली आहेत, त्यातून धांदल सुरू आहे. जे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत, त्यांना या गोष्टी आवडत नाहीत. त्याबाबत स्पष्ट बोलणारे काही मुसलमान आहेत. अनेक मुसलमान माझ्याबरोबर आहेत. देवनारला दंगल झाली, ते आझमगडचे आहेत. हा संस्कृतीतील फरक आहे.

तुमच्या आंदोलनाच्यावेळी अबू आझमी म्हटले होते की, आझमगढहून 20 हजार माणसे आणू.
- काय बापाचा माल आहे का?

त्या पट्ट्यातील अनेक शार्प शूटर, गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले येथे येतात. ते माणसांना मारू शकतात. त्यांच्याशी घर, कुटुंब असलेला मराठी कार्यकर्ता कसा लढणार?
- ज्यांच्याशी लढायचे, तशी माणसे आमच्याकडे आहेत. कोणी महाराष्ट्र लेचापेचा समजू नये. तुम्ही जी कॅटॅगरी मागाल, ती आमच्याकडेही आहे. त्यामध्ये महाराष्ट्र कमी नाही. मग तुम्ही आयटी काढा, नाहीतर काहीही काढा.

समांतर सरकार चालवू नये, असा इशारा सरकार व विविध पक्षांनी तुम्हाला दिला होता?
- मला असं का करावं लागत आहे, याचा सरकारने विचार केला पाहिजे. मी कायद्यानेच बोलत आहे. त्याची अंमलबजावणी सरकार किंवा इतर पक्ष करीत नसेल, तर प्रतिसरकार चालवू नका, असं म्हणायचं? मग तुम्ही करा. इतर राज्यात त्यांची भाषा पहिलीपासून सक्तीची आहे. मग महाराष्ट्रात मराठी का नाही? सगळ्या सवलती महाराष्ट्र सरकारकडून घेऊन मराठी माणसाला ठेंगा दाखवायचा?

कृपाशंकरसिंह यांची निवड मुंबई प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी करण्यात आली. हे तुम्हाला कॉंग्रेसचं उत्तर आहे का?
- कॉंग्रेसने हा मराठी माणसाचा केलेला ढळढळीत अपमान आहे. कृपाशंकरसिंह येवो किंवा अन्य कोणी, मुंबईला काही फरक पडत नाही. मराठी कार्यकर्त्यांच्या डोक्‍यावर उत्तर भारतीय आणून बसवला, याचा विचार त्या पक्षातील मराठी कार्यकर्त्यांनी केला पाहिजे.

इतर पक्षातील मराठी कार्यकर्ते आणि नेते यांना तुमच्या भूमिकेबद्दल आस्था, प्रेम आहे का?
- गुप्तपणे कितीतरी जण फोन करतात. त्यामध्ये कॉंगेस, राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आहेत. तुम्ही करता ते योग्य आहे, आम्ही उघडपणे काही करू शकत नाही. लागेल ती मदत सांगा, असं ते म्हणतात.

तुम्ही वेबसाईट व दूरध्वनीक्रमांक जाहीर केले. त्याला लोकांनी प्रतिसाद दिला?
- आयकर भर्तीबाबत मुलुंडला जे आंदोलन झालं, त्याचा दूरध्वनीच आला होता. अशा अनेक गोष्टी लोकांनी पाठविल्या आहेत आणि त्यावर काम सुरू आहे.

समृध्द महाराष्ट्राबद्दलचे तुमचं स्वप्न काय?
- हे वेगळ्या प्रकारचे आक्रमण थोपवायचं, हा माझा प्रयत्न आहे. आक्रमण वेगवेगळया ठिकाणी पसरलेलं असल्याने एखादा मुद्दा लावून धरला, तर सतत तेच बोलतो, असं म्हणायचं. अनेक प्रश्‍न आहेत! एखादा मुद्दा सोडविण्याचा प्रयत्न करत असताना मुद्दा सोडला, तर म्हणायचं सातत्य नाही! यू टर्न मारला! त्यामुळे मला वाटेल ते मी करतो. मराठी माणसाला समाधान मिळते आहे ना, तो स्वाभिमानाने जगतो आहे ना? याचा मी विचार करतो.

समृध्द महाराष्ट्रातील टूरिझम, शेती, उद्योग आदींबाबत तुमचं काय स्वप्न आहे?
- आम्ही जी अकादमी उभी केली आहे, त्यात त्या क्षेत्रांचं काम सुरू आहे. पाणी हे उद्योग व सिंचनासाठी लागणारं आहे. त्यावर काम सुरू आहे. निवडणुकीच्या वेळी आम्ही हे काम जनतेसमोर ठेवू, की आम्ही काय केलं आणि काय करणार आहोत.

कोणत्याही नेत्याचा उदय झाला की जनतेला वाटतं, की हाच नेता आपल्यासाठी लढेल. पण प्रकाश वेगळ्या वाटेने गेला व जनता अंधारात राहिली. आज तुमच्याबाबत जनतेला वाटत आहे, की तुम्ही काहीतरी कराल. तुमच्यावर विश्‍वास का ठेवावा?
- हे लोकांनी शोधावं. मी माझं काम प्रामाणिकपणे करतो. माझ्या मनाला वाटेल, ते मी बोलतो. ६० वर्षे या लोकांवर विश्‍वास ठेवला, माझ्यावर एकदा ठेवून बघा.

लोकसभेत कणा असलेली किती माणसे पाठवू शकता?
- पाठीचे कणे तपासून पाठवीन. पिचलेल्या पाठकण्याची माणसं पाठवणार नाही. महाराष्ट्राचा आवाज संसदेत उमटविणारा तरूण पाठवीन. त्या योग्यतेचा तो असेल, तरच ती जागा मी लढवीन. झाला तेवढा तमाशा खूप झाला. आता जे काही करायचं, ते योग्य करावं.

तुम्हाला स्वप्न म्हणून विधानसभेत पूर्ण किंवा अंशतः सत्ता हस्तगत करायची आहे, की काय करायचं आहे?
- जेव्हा केव्हा जनता ठरवेल, आता राज ठाकरे, तेव्हा पूर्ण सत्ता द्यावी. तरच महाराष्ट्रात मला जे करायचे आहे, ते मी करू शकेन. ह्याच्या दाढीला हात लाव, त्याला गॅलरीतून डोळा मार, हे मला जमणार नाही.

तुम्हाला प्रशासकीय अनुभव काय?
- ज्यांना अनुभव होता त्यांनी काय केलं? ६० वर्षे म्हणजे तीन पिढ्या गेल्या. एकदा विश्‍वास ठेवा. त्या गोष्टींचं प्रशिक्षण सहकाऱ्यांना देण्याची जबाबदारी माझी. मला सत्तेचा सोस नाही. पण हे प्रशिक्षण अजून सुरू नाही. ते केलं तर तिकीटवाटप सुरू झालं, असं वाटेल. त्यामुळे आता शांत राहिलेलं बरे.

हिंदुत्वाच्या भूमिकेबाबत तुमचं म्हणणं काय?
- हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व असेल, तर ते मला मान्य आहे. हिंदुत्व म्हणजे मुसलमानांना विरोध आहे का? देशावर ज्या पद्धतीचे आतंकवादाचे संकट आहे, त्याला माझा विरोधच आहे ना? त्याला काय प्रोत्साहन देणार? मुस्लिम आतंकवाद जगात किंवा देशात सुरू आहे. तो ठेचलाच पाहिजे. तो कोणत्या धर्माचा आहे, याचा त्यात काही संबंधच नाही. आपल्या समुद्रकिनाऱ्यावर आरडीएक्‍स उतरवलं गेलं आणि ज्यांना माहित होतं, ते उतरवून घेणारे बरेचसे हिंदूही होते. हा हिंदू-मुस्लिम विषय नसून राष्ट्रवाद, कायदा व सुव्यवस्थेचा, करदात्यांचा आणि त्यांच्या सुरक्षेचा विषय आहे.

निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र पादाक्रांत करू, असे तुम्ही म्हणाला होता. किती काळ लागेल?
- मी माझं काम करीत आहे. माझे विषय मांडत मी पुढे जाणार. माझ्या संकल्पेनेतील महाराष्ट्र मी मांडत राहीन. जनता मला ज्या पध्दतीने पाठिंबा देईल, त्यापध्दतीने मी पुढे सरकत जाईल. मला यश मिळेल, याची शंभर टक्के खात्री आहे.

-------------------------------------------

उद्याची मुलाखत - सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मा. अण्णा हजारे.

21 comments:

Unknown said...

aaj Raj sahebanchi, mulakhat pahili..
mulakhat phar chan ghetli hoti ani chan zali suddha..
Raj ani Raju ya donhi sahebanna manapasun Shubheccha..
jai MNS!!
JAI MAHARASHTRA!!
Akshata pandit..
vd.akshata_pandit@yahoo.com

paps sapa said...

this is a gr8 show put up by Saam marathi.. Well done guys. Similar show on Mi Marathi by Kanchan Adhikari (Dilkhulas). We need this kinda shows more to make Maharashtra, rather India a better place to live. :)

@topic : माझी द्विधा मनास्तिथि होते जेव्हा जेव्हा मी राज ना ऐकतो .. THough m not a Political person. But my mind says he is ryt but brain denies.. Neways, gonna wait and watch.. Lets see.. जसा राज म्हणाला तसा.. "एकदा विश्वास टाकुन बघुया !" पण kicking those North Indians outa Maharashtra is not the only solution, rather they should be made to respect the place where they live. Moreover, it should not only be restricted to NorthIndians but even to Maharashtrians who live in Maharashtra and dont know how to respect their city, state.

ssatam said...

Raaj saheb hech Maharashtrachya hitache nete aahet yaa baddal kahi shankach nahi.
Marathi sanskurati ani mararhi manasa baddal che prem tyancha preatek shabdat disun yete.
Yaa Marathi netyala koti koti pranam.
JAI MAHARASHTRA!!
Satish Satam
Ssatam@rediffmail.com

Unknown said...

Khup chan mulakat hote.
Jya ugamtya netya kadhe apan atmiyatene pahato tyacha manat kai khalbal suru aahe he agdi rekhivpane Sam Marathi ne prastut kele.

"jikde dagadfek hot nahi to mudda lokana disat nahi karan te controversy hoth nahi"......he hya deshachi va maharashtra che paristithi aahe.

Raj ji keep up the good work
We all are eagerly waiting for your academy.

JAI HIND
JAI MAHARASHTRA

Anonymous said...

mi ek atyant sadha sarvasamanya tarun aahe. mala rajkarnabaddal kawdichi akkal nahi pun mala ek kaltay aani pat tay RAJ he barobar kartahet aani mazhe tyanna purna samarthan aahe.mi he thampane saangu shakto ki RAJ he udyache kimbahuna attache
MARATHI RUDAY SAMRAT
aahet.
Mala ajun ek mudda maandava sa wat to ki je IPS officer yetat Maharashtrat tyana marathi shikavla jata pun mi kwachit non-Maharashtriya IPS lokana marathit sarva karya kartana pahila aahe.Tyanchya babat suddha RAJ Sahebani kahitari kela pahije.
Aani ajun ek jar kharach jya lokana RAJ yanchya krantila saath dyayachi asel tar tyani aani tyana jar dagadfek aani jalpol nako asel tar tyani aadhi swatahacha aani mag aaplya palyacha marathi bana unchawayla hawa ani pratyekatla marathi aani marathi baddalcha swabhiman wadhwayla hawa.
Aani kharokharach sarva madhyamatlya shaalaan madhye Marathi pahilya pasun shikavla gela pahije.Mala kharatar saangtana laaj waat te pun saangto saglyach ingraji madyamtlya mulana marathi neet yet nahi pan english aani hindi ekdum uttam yeta.Te thik aahe pun Maharashtrian asun marathi nit na yena hi ek lajjaspad bab aahe.
RAJ yana majhya manapasun subheccha.
Saam vahinila aani hya karyakramatlya sarva lokana majhya subheccha.Gharat aamhi sarva lok ha karyakram agdi aawarjun pahto aani Raju yanchya chanakshya panachi daad tyana deto.
JAI MARATHI
JAI MAHARASHTRA
JAI BHARAT
vikram_moule@yahoo.com

Anonymous said...

Jay maharashtra, mi sandip pawar, RAJ THAKARE chi mulakhat atishya changli zali. Mi RAJ yanchy matashi sahamat aahe. RAJ yancha marathicha mudaa ha jari rajakiy watla tari marathi bhashe sathi aani marathi mansa sathi to chalel. Shivaji maharajani je swaraja milaval te kaahi magun milal nahi tyasathi ladhaw lagla. jya lokana saral sangun samjat nahi tyana latha dyavaa lagatat.RAJ yana maza aani mazya mitrancha purna pathiba aahe. Pl help me give mi the no. & e-mail address of RAJ THAKARE.-sandip_pawar@rediffmail.com

Anonymous said...

Me kerala madhe trivandrum ithe eka IT kshetrat ahe...1 neta marathi manasachya bhavitavyasathi khup prayatna karto he news channels var kivva newspaper madhe vachto tevha bare vatte..
me jevha ithe aalo tevha thodi ka hoina pan me Malyalam bhasha shiklo karan ti garaj hoti..
ha mudda Raj sahebaanni kadhla tevha ti gosht mala patli...:)
Aadhi vatayche mumbait atta marathyanche raj rahile nahi pan jevha Raj yanni pudhakar ghetla tevha ase vatle ki marathi atta udayachya shikharavar pohochli ahe..saam TV marathi ne he 1 changle initiative ghetle ahe ani Raj yanchi mulakhat kaal me pahili ani man bharun ale...
"Raj has taken us to the edge of time's great precipice & encouraging us to fly, unlike other politicians who were forcing us to jump to the bottom of ravine!!!!"
JAI MAHARASHTRA!!!
vijay wagh..
vj_1nov@yahoo.com

Anonymous said...

Hello, 1st of all, I would like to congratulate Mr. Raju Parulekar for bringing Mr. Raj Thakare on center stage. I am an IT professional and I have been to various corners of the world. With my understanding, I dont think so that Mr. Raj, anywhere sounds like monotonous or racist for taking the voices of the locals (here maharashtrians). I would like to give you one of my exp. Once I went to the remote part of Karnataka and I met one local there. When I revealed my identity as a Maharashtrian, he first congratulated me for being that and later said that his community has a very high esteem for Balasaheb and Raj Thakare for the way they represent Marathi community and also they wished to have same kind of leaders in Karnataka. I was so surprised at that time but right now I started coming to terms what he actually meant. Today US presidential candidate Barak Obama has anti outsourcing agenda on this manifesto. No one calls him racist or anything else. In IT field today, there is heavy lobbying done by North Indians and Tamils. I dont blame them for that, I think its high time for all the educated maharashtrians to come forward and be open to say and act in favour of fellow maharastrians.
One parting note is, My recommendation is MNS should publish a website. This is the most cost effective and high impact medium to reach to all the educated maharashtrians.
Regards, jeet

Anonymous said...

मी राजेश मोरे...
मी फ़क्त एकाच शब्दात सांगू एस्चितो की . .
पुन्हा एकदा शिवाजी महाराजाचा जन्म राज ठाकरे यांच्या रुपाने जाहला

जय महाराष्ट्र

nikhil kulkarni said...

jay maharashtra!me NIKHIL KULKARNI FROM PUNE, me rajsahebancha 'die-hard' fan ahe,up bihari na bamboo dakhvaylach pahije,punyat tyanchi khup dadagiri hot hoti,pan rajsaheban mule he lok thand ale ahet,maharashtra 21 santanchi bhumi ahe,jagat kothe hi he disun yet nahi,apan shivrayanchya rajyat rahto,maharashtra bhumi maji aai ahe.Karnatakat kanad bola jata,punjab madhe punjabi,tamilnadu madhe tar hindi var javal javal bandi aslysarkhich ahe,tasech andhra madhe hi,mag ashyaveli apli marathi asmita kuthe ahe? RAJSAHEB me manachya koti-koti pasun tumhala dhanyavad mhanto,jay hind jay maharashtra!!!

Anonymous said...

I think that it is time to tame these Biharis and UP people. They come from background where they are never taught to respect law and rules of a civil society. 2 years back these people beat up locals including women and kids in Nashik for non-issue and said 'You people are Maharashtrians and you cant do anything to us'. This is height to arrogance. We dont want these uncouth people in our Maharashtra.
And if there foolish leaders think that these rotten people from there land have made Maharashtra good then, please for god sake take these talented people of yours to UP and Bihar and develop your states. We Dont Want these uncouth people in Maharashtra

Anonymous said...

Raj sahebanchi mulakhat atishay chhan hoti....
.....Raj saheb aamcha tar aata fakt tumchya varch vishwas aahe..aani tumhi to vishwas sarth karnar yaat ver prashnach nahi.....

..anni saam marathi che pan aabhar tyani asha prakarche program sadar kelya baddal......

"JAY MAHARASHTRA"
"JAY MNS"

madhuri kadam
smile.ok.plz@gmail.com

Anonymous said...

maharashtrat marathich paije ani tyala japnara marati manusach paije
"JAY MAHARASHTRA"

Anonymous said...

Maharashtr Raj Thakre cha karan Raj ha SACHA MARATHI neta aahe.aani MNS ch maharashtrala vachvu shkate.pan thumhi MNS chi webside open keli pahije aani tumche mob. no. dila pahije.aani raj yani AARSHAN var aaple mat madave ya babtit koregoan chya SHALINTAI PATIL yachashi me sahmat aahe.tari MAHARASHTR tumchach.

JAI MAHARASHTRA!!
vikas nawadkar.
vikas_nawadkar1@rediffmail.com

Anonymous said...

Hi,

Mee Bharat, marathi bolnara. Mee thodese bolnar ahe yaa mulakahtibaddal. Ek tar haa channel new ahe. Mr. Sharad Pawar yanchya aashirwadane. Tyamule ethe Pawar Family aali nahi.

Dusare, aapale lok Raj la vede zhale. Mhanje tyanchi khurchi fix zhali. Kadachit ethe pre-poll zhale. Channel cha bakkal paisa zhala. Aaplya ethe ajun lokana paisa kamvila jato hey samjat nahi.

Tisare, kon kasa ahe tya peksha aapan kase ahot te paha. Ugi chaneel bagun timepass karu naka. Kaam kara. Kamacha vasa ghya. Wachan wadhava. Haa salla nhave. Faltu likhan mhanun sodun dya. Aani jamale tar aaplya gharat kai kele pahije te paha. Jyana aapale ghar, aapala bhau, relatives yanchyashi changale sambandh thevta yet nahit te kai konala sudharnar?

Lokho jage wha. Dole ughdun paha. Fim wale kase paisa kamvtat. Lok vede karun Bass toch prakar ahe ha. Aapale ghar bagha.

Aapan Law paluya. Traffic, help, flood, poor lok, sudna wha.

Bharat.

Yuvraj Huge said...

Raj chi mulakat mhanavi tashich zali....Kadak ani Marhati !!!
Jaya bachchan mhanalyapramane Raj kharach maharashtracha raja aahe... aadhi balasaheb ani aata Raj hyanchya prayatnamulech aaj maharashtrat Marathi bhasha tikun aahe...ani tikun rahanar aahe.. arthat hyala karyakartyanchahi vaghacha vata aahe.. Shiv Sena ani MNS sarakhe paksha nasate tar aaj dhipadi dhipang chya aivaji bhojapuri kinva aasami gan ekava lagala aasata.
Raj la hardik shubechya ani khup khup dhanyavad !!!

Jai Maharashtra...Maza maharashtra...Aapla maharashta!!!

Unknown said...

aaj Raj sahebanchi mulakhat vachat asatana khup chan vatale. mazya, marathi manasachya manatil sagal Raj ji bolat aahet ase vatale. maharashtrala asha Leader chi garaz hoti.Khup kahi karayache aahe Raj saheb tumhala, sagala maharashtra tumachya pathishi aahe.
Jai Maharashtra
Jai MNS
deepti bhosale

Anonymous said...

Raj sahebanchi mulakat mastch jhali

Purushottam Shete said...

Sarwa pratham Sham TV ani "Maharashtra Konacha" Chya team che hardik abhi nandan.
Karyakram far sundar ani surekh akarnyat aala aahe...

Ani Raj thakarenna wicharalelya prashnachhe far kautuk watate.

Hya sarwa mulakhati pahilyawar Ek prashna manat yeto to

"Marathi manasala garaj kashachi ?"

1. Pragati chi ?
Pragati mhanage, Shaharatil bedhund vij chori, vijecha gair vapara ?
Vs
Ani shetala pani denyasathi vijechi vat pahanarya shetakari ?

2. Shikshana chi ?
Admission sathi Parprantatil lokanni dilelya gadganj donesion ?
Vs
Donession che paise jamvat phirnarya garib marathi palaka ?

3. Karj mukti chi ?
Shetakarya cha mal vikun gad ganj zalele lok ?
vs
bhava abhavi,Karj chukavat kashetari fakt ek veles jevanara shetkari ?

4. Rojagarichi
Paise bharun, vashile laun, kivva marathi manus kam karat nahi ya nakhali
bhumiputranna rojgar na deta par prantiyaaana nokari dene
Vs
berojgar, hatash, Garib, akroshane bharalela, marathi tarun...

5. Kharya netyachi
Ac havet basun, shetkaryachya atmahatevishayi charcha karnarye bhrashtachari nete
garibannhya potaar pay devun, paise banavanare lok.
Vs
Khare bolnare, tarunanna navi ashechi kiran dakhavnare lok

6. ka savay nirashechi
rajkiya pakshya chya ashvasanachya nirashechi..
rastyatalya khadyanchi..
lok akroshatil todfodochi...
vadhalelya bajar bhavachi...
Atokya baher chay gharachya swapnachi...
tarunachya beroj garichi...
shitila vijechi, shetila panyachi...

Potala bhukechi ani dokyalya chatachi...
kay lagali aahe savay marathi manasala nirashechi... ?

Khari maharastra la garaj kashachi . . . ?

mazya mate tari garaj aahe jan jagrutui chi...

Sonal said...

mala raj sahebanchi mulakhat tv var bagta nahi aali pan aaj me ti ithe vachli. me saam marathi che hardk abhinandan karte ki tyaani asya mulakhat ghetli.Aaj marathi manus kuthe tari haravla aahe kiva toh lapat asel, aaj tyala hi garz ka padli? Toh samor yeun bolat nahi ki mi MARATHI manus aahe?? Aaj Maharashtra madhe hi stithi nirmaan jhaali aahe, durdaivach mhanave lagel aata..
he sagle hyasaathi ki aaj amcha awaaz saglikade pohanchat nahin; jara koni awaaz ucchala tar toh dabavnyaat yeto.

Aaj Raj saheb ani amcha awaaz ucchala aahe tar tyanchya awaaz dabnyasaathi kiti kadak prakriya keli jaate, thet delhi varun orders yetat.
Kahi aso Raj saheb tumhi phakt saanga, ek nahi hazzaron lok tumchya paathishi aahe
JAI MAHARASHTRA
JAI MNS

Anonymous said...

Mala raj sahebanchi mulakhat tv var baghta ali nahi pan tyanchi mulakhat mi paper madhe vachli .
Rajsaheb agdi mazya manatle bolat hote ani tyanche sarve mude malla patle. Aaj MAHARASHTRA la Rajsahebansarkha neta CM mhanun hava ahe. sara MAHARASHTRA tumcha pathi shi ahe .
Jai MAHARASHTRA!!!!
JAI MaNaSe!!!!!!!!
Raj saheb jindabad